Tuesday, 14 March 2017

आजची स्त्री


आजची स्त्री

सातच्या आत घरात नाही
पण सातच्या आत
घरचा उबरठा ओलांडणारी
डोळ्यात आशावादी स्वप्न
हातात कर्तुत्वाची ढाल
हृदयात वात्सल्याचा सागर
चेहऱ्यावर रणराणीची झळळी
डोक्यात संगणकाचे ज्ञान
सुगरणीच्या खोप्याप्रमाणे
पिलांसाठी जीव घरी टांगलेला
परंपरांचा जुनाट कोशा फेकून
करारीपणची वस्त्रे लेवूनी
स्वरक्षणया  देशरक्षणाया निघाली
क्षितिज हिच जिला मर्यादा
तिच आजची स्त्री …………..!

स्त्री शक्तीला सलाम

कवितेचे नाव :  ती . . . जिच्याविना सगळे अधुरेच

नाही चालणार हे जग,
ह्या जगाचा आधार तिचं,
चमत्कार हा देवाने केला,
ह्या विश्वाचा स्त्रोत तिचं . . .

तिच्यामुळेच पूर्ण होतो,
तो राजा आणि तो रंक,
तिच्याविना सगळे अधुरेच,
काही मोजण्याइतकेच अंक . . .

तिचं आई, तिचं मुलगी,
तिचं जीवनाची साथीदार,
जर संपली तिची उत्पती,
तर मिळेल का हो आधार . . .

वंशाचा दिवा पेटण्यासाठी,
वातं तिचं असते,
दिवा पेटतो आणि प्रकाशमय होते सगळे,
पण ती वात तशीच जळत असते . . .

इतके महत्व तिचे,
कोण समजेल का कधी,
मुलगी म्हणजे लक्ष्मी म्हणतो आपण,
तरी वाढ खुंटते तिचीच . . .

सगळे मिळूनी आता,
ह्या जगास द्या एकाच नारा,
थांबवा मुलींची हत्या,
कारण तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . .
तिच्याविना सगळा कोरडाच वारा . . .

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या

स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या एकाच माळेतले तीन मणी

गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगतिकतेतून निर्माण झालेली ही मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत. ग्रामीण आणि शहरी उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही यामध्ये असले तरी याबाबत दीर्घकालीन कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे.

आज स्त्रीभ्रूण हत्या हा एक चिंतेचा मुद्दा बनत चालला आहे. महाराष्ट्रात बीड जिल्हयाप्रमाणे आता मुंबईतही अशा हत्या झाल्याचे उघड होत आहे. गर्भलिंग परिक्षा आणि मग मुलगी असेल तर गर्भपात हे समीकरण होत चालले आहे. या देशात स्त्री मातेसमान मानतात स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे’ किंवा  `घरी मुलगी जन्मली’ की `घरी लक्ष्मी आली’ इत्यादी विचार व्यक्त होतात. त्याच भारत देशात आज राजरोजपणे स्त्री भ्रूण हत्या होताना दिसत आहेत. असे का होत आहे हे शोधणे महत्त्वाचे आहे.
गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या या आज काल सुरू झाल्या असे म्हणणे धाडसाचे होईल. हे पूर्वीपासून होत आहे. परंतु याचे प्रमाण आता खूपच वाढले आहे. काय आता आईला मुलगी नको असते की जन्मदात्याला मुलीचा बाप होणे आवडत नाही अशी कोणती मजबूरी असते की स्त्रीसुद्धा हे पाप करायला तयार होते. या सर्व गोष्टींचा विचार करता एक लक्षात येते की ही एक अगतिकतेतून निर्माण झालेली मानसिकता आहे. या अगतिकतेची अनेक कारणे आहेत तसेच ग्रामीण शहरी तसेच उच्चभ्रू असे वेगवेगळे स्थरही आहेत. शहरी आणि उच्चभ्रू वर्गाची स्त्रााrभ्रूण हत्येमागची कारणे वेगळी आहेत. त्याचा वेगळा विषय होऊ शकतो.

स्त्री भ्रूण हत्या

stri bhrun hatya in marathi kavita साठी प्रतिमा परिणामhttps://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcQ93y6taHxW-9r2imAfGj91XuTnVdqcG6MDaw2nax95mNQtMp6z3A